Posts

Showing posts with the label OCT22

5. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताच्या विकासाच्या वाटचालीत उपासमार अथवा भुकेचा प्रश्न आणखी तीव्र होतांना दिसत आहे. नुकतेच जाहीर झालेला जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये 121 देशांमध्ये भारत 107व्या स्थानावर आहे. भारताच्या आधी नेपाळ (81), बांगलादेश (84), पाकिस्तान (99) आणि श्रीलंका (64) या शेजारी देशांची क्रमवारी लागते. भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचं यातून विशद होतं.. कोविडमुळे ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक झालेली दिसते. पुढच्या पिढीला योग्य पोषण मिळाले, तरच त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होतो.तीव्र कुपोषित बालकांमध्ये विविध आजारांनी बालमृत्यू होण्याचे प्रमाण नऊ पटींनी वाढते. विविध सरकारी सामाजिक आस्थापना देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी मोठी पाऊले उचलतात. ' एक देश, एक रेशन ' तथा इतर काही धोरणांची योग्यरीत्या अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरते. परिस्थिती स्वीकारून त्यावर सकारात्मक पद्धतीने प्रभावी उपाययोजना करणे अशी या संस्थेंची आणि सजाण नागरिक म्हणून आपली वैशिष्ट्ये असली पाहिजे... ~ सचिन विलास बोर्डे 1/5 Hunger | GHI | Malnutrition  NEXT 🔹 PREVIOUS

4. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्लीच्या तरुणाला लागलंय ते सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांच व्यसन.. हा तरुण माध्यमांचा हवा तसा वापर करून घेण्यात कुठलीही कसर सोडीत नाही. अन् त्यातून जन्माला येते सायबर गुन्हेगारी... (उदा. Identity Theft, Financial Fraud, Cyberbullying, Harrasment, Morphing, Child Pornography, Drugs, Phishing)  समाजमाध्यमे ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व क्रांतीच होय. त्यांचा वापर उन्नत, ज्ञानसंपन्न समाज घडविण्यासाठी, माणसामाणसांतील दुरी बुजवण्यासाठी करण्याऐवजी आजकाल लोकांमध्ये दुरावा, द्वेष, अफवा, बदनामी आदी हेतूंसाठीच जास्त होताना दिसतो. यावर आळा घालण्यासाठी सरकारी आस्थापना कायम प्रयत्नशील असतात. शिक्षित या नात्याने आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराची नोंद करणे सजाण भारतीय नागरिकाचे वैशिष्टे असावे. सोशल मीडियाच्या व्यसनाचे रूपांतर साक्षरतेच्या व्यसनात करणे ही तरुणाची भूमिका असायला हवी..! ~ सचिन विलास बोर्डे 1/4 Cyber Crime | Social Media | Youths  NEXT 🔹 PREVIOUS

3. विकासाच्या वाटेवरील भारत!

"शंका उपस्थित न करता चमत्काराला सत्य मानून शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते" एकविसाव्या शतकात इतिहासजमा होत असलेली नरबळीची प्रकरणे पुन्हा नव्याने वर डोके करू पाहतायं..! नुकतेच केरळमधील थिरुवल्लाजवळील कोंझेचेरी तालुक्यातील एलंथूर खेड्यात घडलेले विधिवत हत्येचे हे प्रकरण मागासतेचे प्रतिनिधित्व करते. आधुनिकतेकडे वाटचाल करीत असलेल्या समाजातील काही घटकांद्वरे केवळ आत्मकेंद्री स्वार्थासाठी नरबळीचा मार्ग अवलंबिने कितपत योग्य ठरते, हे आपणच समाज घटक म्हणून विचार करणे महत्वाचे ठरेल. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 'जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत' अटक केली असली तरी समाजात बुध्दीसापेक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची नितांत गरज यावरून भासत आहे... येणाऱ्या पिढीने असल्या मानसिक गुलामगिरीला बळी न पडता तर्कशुद्ध विचार करण्यावर भर द्यावा कारण तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे पहिले लक्षण होय ..! ~ सचिन विलास बोर्डे 1/3 Human Sacrifice | Kerala | Superstition NEXT 🔹 PREVIOUS

2. विकासाच्या वाटेवरील भारत!

अविवाहित स्त्रियांना देखील गर्भपाताचा अधिकार देणे म्हणजे उच्च न्यायालयाने केलेली नुकतीच उल्लेखनीय कामगिरीच.! स्त्रीला तिच्यावर लादली जाणारी गर्भधारणा, लादले जाणारे मातृत्व नाकरण्याचा कायदेशीर हक्क आहे याच पार्श्वभूमीवर गर्भपात कायदा कलम 3 (ब) ची कक्षा अधिक व्यापक बनविणारा हा निकाल... एखादी स्त्री अविवाहित आहे म्हणून 20 आठवड्याच्या पुढे गर्भपात करू शकत नाही आणि एखादी स्त्री विवाहित आहे म्हणून ती 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करू शकते, हा मुद्दाच न्यायालयाने तर्कविसंगत ठरविला. नवऱ्याकडून होणाऱ्या सक्तीच्या लैंगिक संबंधांना देखील याच निकालामधून बलात्काराच्या कक्षेत आणून न्यायालयाने समस्त भारतीय स्त्रियांना खरोखरच दिलासा दिला आहे. विवाहित अथवा अविवाहित ही तफावत नष्ट करत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खरोखरच बुद्धिनिष्ठ आणि प्रागतिक विचारसरणीचे प्रतीक ठरतो.  ~ सचिन विलास बोर्डे 1/2 MTPAct | Supreme Court | Women Empowerment  NEXT  🔹  PREVIOUS  

1. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताच्या विकसिततेच्या वाटेवरील सर्वात मोठे शिखर म्हणजे शिक्षण . आपल्या 130 कोटींहून अधिक नागरिकांच्या देशात शिक्षणासाठी सरकारी तरतूद अडीच टक्के इतकीही नाही. त्या तुलनेत चीन, अमेरिका आदी देशांत शिक्षणासाठी दोन आकडी टक्क्यांनी भरीव तरतूद असते. अनेकानेक भारतीयांस परदेशांत शिक्षणासाठी जावेसे वाटते ते केवळ यामुळे. तेव्हा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील अधिकाधिक वाटा शिक्षणासाठी कसा खर्च होईल याची तजवीज करावी लागेल. शिक्षणातील सकारात्मक बदल प्रत्यक्षात येण्यासही बराच कालावधी लागतो. आज जर गुंतवणूक केली तर तिची फळे दहा-पंधरा वर्षांनी दिसू लागतील. पण प्रत्यक्षात आज आपण फक्त करत आहोत ती चर्चा. प्रत्यक्ष गुंतवणूक बदल शून्य आहे. विकासाचे हे शिखर प्रत्यक्षात गाठण्यासाठी चर्चा आणि गुंतवणूक यातली तफावत कमी करणे महत्वाचे ठरेल.! ~ सचिन विलास बोर्डे 1/1 Education | GDP | Investment  NEXT 🔹 PREVIOUS