Posts

Showing posts with the label APR25

135. विकासाच्या वाटेवरील भारत!

लेख क्र. 30/4 मध्ये ' धर्मावर धर्म घासल्याने ' निर्माण होणाऱ्या आगीचे विश्लेषण आपण बघितले होते. दोन गटांत फूट पडल्याने तिसऱ्या गटाला वर्चस्व मिळवणे सुलभ होते हेही आपण बघितले. नुकत्याच घडलेल्या " पहेलगाम " मधील घटनेनंतर या तिसऱ्या गटात " दहशतवादाचाही " समावेश करावा लागेल. देशांतर्गत असलेल्या धार्मिक फाटा-फुटींचा, जातीय समीकरणांचा आजवर राजकीय पार्ट्यांना अन् राजकारण्यांना सत्ता टिकविण्याकरिता फायदा होत आला. मात्र याच धार्मिक फाटा-फुटींचा फायदा दहशतवादी संघटनाही घेऊ शकतात हे काश्मीरातील पहेलगाम घटनेने सिद्ध केलयं. देशातील सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी आपल्या सोयीनुसार जातीय समीकरणांचा उपयोग करून घेतला. परिणामी दोन धर्मांतील नागरिकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. दोन्ही धर्मांतील नागरिक एकमेकांपासून दुरावत गेले. आता हा दुरावा अत्यंत टोकाला पोचलेला दिसतोय. ' हिंदू विरुद्ध मुस्लिम ' हेच समीकरण अनेकांच्या डोक्यात फिट झालंय. याच समीकरणाचा फायदा घेत पहेलगाम घटनेने या दुराव्यात भर घातलीय, देशात पुन्हा अशांतता निर्माण केलीय. पहेलगाम घट...

134. विकासाच्या वाटेवरील भारत!

अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आले. अन् ट्रम्प यांनी विविध धोरणे जाहीर करण्यास सुरुवात केली. यातील चर्चा करण्याजोगं धोरण म्हणजे " आयात शुल्काचं (Tariff/Import Duty) ". आयात शुल्क म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. स्थानिक, देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी आयात शुल्क आकारण्यात येतो. समजा अमेरिकेने आयात शुल्क वाढविले तर, अमेरिकेत आयात झालेल्या वस्तूंची किंमत वाढेल, या वस्तू महाग होतील परिणामी अमेरिकेतील ग्राहक देशी वस्तूंकडे वळतील. स्थानिक वस्तूंची मागणी, उत्पादन आणि विक्री वाढेल. बहुतांश देशांनी ' खुल्या अर्थव्यवस्थेचा ' स्वीकार केला असल्याने एखाद्या देशाच्या व्यापार करातील बदलांचा इतर देशांवरही परिणाम होतो. भांडवली बाजार, तेल बाजार, सोने बाजार यातही चढ-उतार होतात. बऱ्याचदा अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीचे चक्रही बघायला मिळते. आयात शुल्काच्या वाढीमुळे जागतिक व्यापारावर मर्यादा येऊ शकतात तसेच ' व्यापार युद्धे ' देखील आकारास येऊ शकतात. अमेरिकेने अलीकडेच विविध देशांकरिता विविध आयात शुल्क निश्चित केले आह...

133. विकासाच्या वाटेवरील भारत!

आजच्या लेखात मनुष्याचे " वैचारिक जग आणि वास्तवातील जग " यांच्या सहसंबंधांची चर्चा करूया. खरेतर याच दोन्ही जगांमध्ये मनुष्याच्या सुख-दुःखाची मुळे शोधता येतात. मनुष्याकडे विवेक आहे आणि तो विचार करतो यामुळे मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा गणला गेला. याच गुणांमुळे मनुष्याने आजवरची प्रगती साध्य केली. वैचारिक लिखाणातून वास्तवातील जगावर चर्चा केली गेली. अन् यातून चिद्वाद/आदर्शवाद (Idealism), वास्तववाद (Realism), भौतिकवाद (Materialism) अशा तत्त्वज्ञानाच्या शाखा विकसित झाल्या. या दुनियेचं अन् या दुनियेतील संकल्पनांच आहे तसंच वर्णन वास्तववाद आणि भौतिकवाद करतो. हा वास्तववादी आणि भौतिकवादी विचार ' काय आहे ' या वास्तविक प्रश्नावर अधिकचा भर देतो. याउलट आदर्शवादाचा ' काय असायला पाहिजे ' या वैचारिक प्रश्नावर भर असतो. काय आहे आणि काय असायला हवं या मूलभूत प्रश्नांतूनच या विचारांचा उगम झाला. हेच विश्लेषण आपण आता एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा सर्वांच्या परिचयाची ' प्रेम ' ही भावनिक संकल्पना घेतली, तर वैचारिक जगात प्रेम ही भावना मनाला आनंदी करणारी वाटते, मानसिक सुख देण...

132. विकासाच्या वाटेवरील भारत!

पृथ्वीच्या वातावरणात 21% ऑक्सिजन असल्याचं विज्ञान सांगत. मानव-प्राण्याच्या अस्तित्वासाठी हा ऑक्सिजन वायू अत्यंत महत्त्वाचा. ऑक्सिजनच्या निर्मितीत " जंगले/वने/Forest " मोठी भूमिका बजावतात. झाडे, वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषतात अन् ऑक्सिजन बाहेर सोडतात. थोडक्यात, वनांनी मानवाच्या उत्क्रांतीत ' प्राणवायूची भूमिका ' बजावली. श्वास घेण्यासाठी प्राणवायू पुरवला, पोटाची भूक शमविण्यासाठी फळे पुरविली. (वनांनी केलेल्या या उपकाराच्या जाणीवेतूनच वनांची पूजा (Worship) आजही अनेक ठिकाणी केली जाते.) इतिहासकाळातील मानवाकडे मर्यादित गरजा अन् अमर्याद संसाधने होती. आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना लोकसंख्येत वाढ होत गेली मात्र संसाधनांची त्यातुलनेत वाढ झाली नाही. परिणामी ' अमर्याद गरजा अन् मर्यादित संसाधने ' हा पेचप्रसंग निर्माण झाला. हा पेच सोडविण्याकरिता अन् मानवी गरजा पूर्ण करण्याकरिता आधुनिक मानवाने यंत्र-तंत्राच्या विकासावर भर दिला. यंत्र-तंत्राच्या विकासातून मोठ-मोठे शहरे विकसित झाली. या शहरांत गरजा भागविणारे उद्योग, कारखाने, कंपन्या स्थापन झाल्या. मात्र ' मानवा...