97. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच दिल्लीतील 'जुन्या राजेंद्रनगर (ORN)' भागात घडलेली दुर्घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. राव आयएएस स्टडी सर्कल या शिकवणी क्लासेसच्या तळघरात पावसाचे पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

त्यानंतर या घटनेकडे लक्ष वेधण्याकरिता अन् विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याकरिता इतर विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केलीत. यातून शिकवणी क्लासेसवाल्यांची झोप उडाली अन् झोपलेल्या प्रशासनाला जाग आली.

दिल्लीच्या ORN भागात अधिकारी घडविणाऱ्या अनेक 'फॅक्टऱ्या' (क्लासेस) आहेत. देशाच्या विविध भागातून विद्यार्थी शिकण्याकरिता त्याठिकाणी जातात. क्लासेसवाल्यांचा, लायब्ररीवाल्यांचा, घरे भाड्याने देणाऱ्यांचा, मेसवाल्यांचा या विद्यार्थ्यांमुळे चांगलाच फायदा होतो. या सगळ्यांना फायदा महत्त्वाचा असल्याने हे गुणवत्तेकडे जास्तीचे लक्ष देत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होते.

कदाचित क्लासेसवाल्यांचे वाचनालय तळघरात नसते, प्रशासनाने अवैध बांधकामांवर वेळीच कार्यवाही केली असती, विद्यार्थ्यांनी गैरसोईबद्दल वेळोवेळी तक्रारी केल्या असत्या तर कदाचित त्या तिघांचे आयुष्य बुडाले नसते.

क्लासेसवाल्यांनी आपला फायदा थोडासा बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या हिताचाही विचार करावा. नियोजनपूर्वक बांधकाम करायला हवे. प्रशासनानेही पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करायला हवे. अवैध बांधकामे तातडीने निकालात काढावी. विद्यार्थ्यांनीही त्यांना होणाऱ्या गैरसोईबद्दल तक्रारी करायला हव्या. यातूनच अशा समस्यांची सोडवणूक होऊ शकेल..!


~ सचिन विलास बोर्डे

23/1

Delhi | Old Rajender Nagar | Coaching Centre | Student Protest | Flooding Incident | UPSC | Library in Basement | Education 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!