50. विकासाच्या वाटेवरील भारत!
'इंडिया की भारत' हा मुद्दा काही दिवसांपासून राजकारणात
ऐरणीवर आलाय. राज्यघटनेने देशासाठी INDIA आणि BHARAT ही दोन्ही नावे सुचवलेली. तथापि केंद्र शासनाने 'भारत' या नावाला अधिक पसंती दर्शविल्याने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जणू 'राजकीय रस्सीखेच' सुरू झालाय.
विरोधकांनी निर्मिलेल्या 'I.N.D.I.A' नावाच्या युतीला विरोध दर्शविण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असावा, अशी विरोधकांची चर्चा. भारतातील अनेक नागरिकांनी या निर्णयास संमती दर्शवली तर अनेकांनी विरोध. असो...
शासनाच्या या निर्णयामागे निश्चितच काही तर्क-वितर्क असतील, त्याचीच चिकित्सा करण्यासाठी आजचा लेख प्रस्तुत करीत आहे.
तब्बल त्र्याहत्तर (73) वर्षांपासून भारतीय संविधान अविरतपणे देशाला योग्य दिशा देतय. काळानुरूप यात बदलही होत आलेत. आत्ताच्या घडीला होणारा हा 'नावाचा बदल' खरेच उपयुक्त आहे काय? कुठलाही निर्णय घेऊन त्याला 'परंपरेचे अधिष्ठान' देऊन लोकांची मूकसंमती मिळवणे योग्य आहे काय? ही मला पडलेली काही निरागस प्रश्न...
या प्रश्नांची निरागस उत्तरे आणि तर्क-वितर्क पुढीलप्रमाणे -
इंडिया ऐवजी भारत केल्याने भारतातील गरिबी, उपासमार, कुपोषण, आरोग्य, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला-बालके तथा मागासवर्गीयांवरील अन्याय-अत्याचार, लैंगिक असमानता, जातीभेद, गुन्हेंगारी, भ्रष्टाचार हे प्रश्न सुटतील.
आणि निश्चितच आपण 'विकसित राष्ट्र' म्हणून उदयास येऊ..!
~ सचिन विलास बोर्डे
12/2
Constitution | INDIA | BHARAT
Comments
Post a Comment