15. विकासाच्या वाटेवरील भारत!
'बेरोजगार' हा शब्द पिढ्यान् पिढ्या अधिक व्यापक होत आहे. नुकताच ' सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)' चा अहवाल जारी करण्यात आलाय. त्यात असे प्रत्ययास येते की जानेवारी 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 6.56% नोंदवण्यात आला होता, तोच दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3% पर्यंत पोहोचलाय. शहरी भागात हा दर 10%, तर ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण 7.5% नोंदवण्यात आले. क्षेत्रनिहाय बेरोजगारीचा विचार करता हरियाणा (36.4%) अग्रक्रमावर आहे, त्याखालोखाल राजस्थान (28.5%), दिल्ली (20.8%). सोप्या भाषेत बेरोजगारीने पुन्हा शिखर गाठले... ही बेरोजगारी अनेक समस्यांचा मूलाधार ठरते. त्याचा थेट परिणाम देशाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणावर होतो. "बेरोजगारी का वाढते?" - शासन रोजगार निर्माण करण्यात असक्षम, तरुणांमध्ये कौशल्यांचा अभाव, लोकसंख्येच डोईजड ओझ, बँकांद्वारे व्यावसायिक कर्ज देण्यात दिरंगाई, Crony Capitalism , शासकीय ध्येय-धोरणांबद्दल माहितीचा अभाव इत्यादी कारणांमुळे बेकारी वाट्याला येते. उपरोक्त कारणांचे सखोल आकलन केल्यास त्यातच उपाययोजना दडलेल्या दिसतात. सरकारी आणि खाजगी क्षेत्...