Posts

Showing posts with the label JAN23

18. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकताच आपण प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.  त्यासंदर्भात हा लेख सादर करीत आहे. 74 वर्षापूर्वी भारताला नियमांचा संच तथा योग्य दिशादर्शक असे संविधान प्राप्त झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. तीच लोकशाही जी लोकांद्वारे लोकांसाठी चालविली जाते. जे लोक लोकशाही चालवीत आहेत त्यांची स्थिती अन् ज्यांच्यासाठी चालविली जात आहे त्या नागरिकांची परिस्थिती याचे विश्लेषण करण्याची मला गरज वाटत नाही. ती वास्तविकता आपण सगळे जगत आहोत. थेट संविधानाचे आकलन न करता आपण प्रस्तावनेचे विश्लेषण करूया. शालेय जीवनात आपण संविधानाची प्रस्तावना तोंडपाठ करण्यावर भर दिला, आकलन मात्र शून्य..! नंतर त्या दस्तऐवजाकडे पाहण्यासाठी नागरिकांना वेळच मिळेना. हे भारतीय नागरिक संसार, नौकऱ्या, सण-समारंभ, जातीय मतभेद, चित्रपट, सोशल मीडिया यातच गुरफटून गेलेत. ही शैक्षणिक मागासतेची लक्षणे. "प्रस्तावनेचे विश्लेषण" - संविधानाचे सार प्रास्ताविकेत प्रतिबिंबित होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही ही सार्वभौम राज्यसंस्थेची वैशिष्टे असतील. सर्वांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळावा; विचार करण्याचे तथा विचार मांडण्...

17. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या लेखामध्ये (4/3) आपण संपत्तीचे विषम वितरण स्पष्ट करण्याकरिता विश्लेषकांची मते मांडली होती. तद्वतच 'ऑक्सफॅम ( Oxfam )' चा अहवाल प्रकाशित झाला.  भारतातील 1 टक्के लोकांकडे सुमारे 40.5 टक्के इतकी संपत्ती एकवटलेली आहे. तथापि 50 टक्के (700 दशलक्ष) जनतेच्या वाटेला 3 टक्के संपत्ती आल्याचे हा अहवाल दर्शवितो. अशा विषम वितरणाचे फलित काय असू शकेल, याची चाचपणी आपण अगोदर केलेली आहे. 'गरिबी आमच्याच वाट्याला का?' असा प्रश्न सर्वांचाच मात्र त्याची उत्तरे शोधण्याची धडपड आपण करीत नाही. हेच मोठे दुर्दैव. किंबहुना आपण वाट्याला आलेली ती लाचारी स्वीकारत जगत असतो. 'ऐतिहासिक पार्श्वभूमी' - मानवी उत्क्रांतीपासून मानवाचा आणि संसाधनांचा संबंध पहावयास मिळतो. मानवी विवेक विकसित होत गेला अन् मानवाने स्वार्थी वृत्ती धारण करण्यास सुरुवात केली. त्या स्वार्थावर आळा बसावा आणि संसाधनांचे समान वितरण व्हावे यासाठी राज्यसंस्थेचे निर्माण करण्यात आले. खरेतर शासनाची आजही हीच भूमिका असावी. असे अपेक्षित.  या अहवालामध्ये सविस्तर विश्लेषण नमूद केले आहे. त्याचा आढावा घेत जनतेने आणि शासनाने योग्य भूमिक...

16. विकासाच्या वाटेवरील भारत!

क्रोनी कॅपिटॅलिजम ( Crony Capitalism ) ही संकल्पना अर्थव्यवस्था, समाज, राजकारण, भ्रष्टाचार अशा विविध आयामांशी संलग्न करता येते. शासन आणि भांडवलदार यांच्या हितसंबंधांना जपणारे आर्थिक ध्येय-धोरणे म्हणजेच क्रोनी कॅपिटॅलिजम..! 'याचा आणि सर्वसामान्य जनतेचा काय संबंध' असा प्रश्न उपस्थित केला असता त्याचे विश्लेषणात्मक उत्तर शोधणेही तितकेच महत्त्वाचे. काही विश्लेषकांच्या मते, भारताच्या एकूण संपत्तीतील 85% संपत्ती केवळ 5% अभिजन वर्गाकडे केंद्रित झालेली आहे. अन् उर्वरित 15% संपत्ती 95% लोकांच्या वाटेला आलेली दिसते. हा महाकाय दुभंग हितसंबंधांचा संघर्ष निर्माण करतो. याचे दूरगामी परिणाम जनतेच्या अन् एकांदरीतच भारताच्या वाटेला येतात.  देशाचा केवळ GDP वाढलेला दिसतो मात्र देशांतर्गत संपत्ती/संसाधनांचे असमान वितरण पहावयास मिळते. सोप्या भाषेत, श्रीमंत गट आणखी श्रीमंत होत आहे अन् सर्वसामान्य लोक दरिद्रीच्या डोहात शिरत आहे... ही दुर्दैवी वास्तविकता आपण लक्षात घेतली पाहिजे. ~ सचिन विलास बोर्डे 4/3 Crony Capitalism | SocioEconomic Conditions | Inequality NEXT 🔹 PREVIOUS

15. विकासाच्या वाटेवरील भारत!

'बेरोजगार' हा शब्द पिढ्यान् पिढ्या अधिक व्यापक होत आहे. नुकताच ' सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)' चा अहवाल जारी करण्यात आलाय. त्यात असे प्रत्ययास येते की जानेवारी 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 6.56% नोंदवण्यात आला होता, तोच दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3% पर्यंत पोहोचलाय. शहरी भागात हा दर 10%, तर ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण 7.5% नोंदवण्यात आले. क्षेत्रनिहाय बेरोजगारीचा विचार करता हरियाणा (36.4%) अग्रक्रमावर आहे, त्याखालोखाल राजस्थान (28.5%), दिल्ली (20.8%). सोप्या भाषेत बेरोजगारीने पुन्हा शिखर गाठले... ही बेरोजगारी अनेक समस्यांचा मूलाधार ठरते. त्याचा थेट परिणाम देशाचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणावर होतो. "बेरोजगारी का वाढते?" -   शासन रोजगार निर्माण करण्यात असक्षम, तरुणांमध्ये कौशल्यांचा अभाव, लोकसंख्येच डोईजड ओझ, बँकांद्वारे व्यावसायिक कर्ज देण्यात दिरंगाई, Crony Capitalism , शासकीय ध्येय-धोरणांबद्दल माहितीचा अभाव इत्यादी कारणांमुळे बेकारी वाट्याला येते. उपरोक्त कारणांचे सखोल आकलन केल्यास त्यातच उपाययोजना दडलेल्या दिसतात. सरकारी आणि खाजगी क्षेत्...

14. विकासाच्या वाटेवरील भारत!

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची पहाट आपण गाठलीय. गतवर्षात आपण अनेक सुख-दुःखाला सामोरे गेलो आहोत. वैयक्तिक पातळीवर विचार करता अनेकांनी यश-अपयश गाठले, अनेकांसाठी आनंदाचे वर्ष होते तर अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, तथा अनेक समस्यांना सामोरे गेले. देश पातळीचा विचार करता, भारताने अनेक यशाच्या शिखरावर आपले अस्तित्व रोवले. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली.  देशांतर्गत सुध्दा भारताने विविध जनहिताच्या योजना/धोरणे/निर्णय या माध्यमातून यश संपादन केले. तथापि भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भुकेचा प्रश्न, कुपोषण, गरिबी, आरोग्य, गुन्हेगारी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, आत्महत्येचा प्रश्न, लोकसंख्येचा प्रश्न ह्या पारंपारिक समस्या आजही पहावयास मिळतात. ह्या समस्येचं निराकरण व्हावं, तरुणांने शिक्षणाकडे वळावे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, महिला सक्षमीकरण व्हावे, गुन्हेगारीला आळा बसावा, भारताचा विकास अजून गतिशिल व्हावा या इच्छा मनाशी बाळगत आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा अर्पण करीत आहे..! ~ सचिन विलास बोर्डे 4/1 2023 | Happy New Year | Good Wis...