9. विकासाच्या वाटेवरील भारत!

काही दिवसांपूर्वी आपण 'बालदिनानिमित्त' विविध समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव केलायं. खरेतर ते योग्यच...

पण भारताच्या विकासाला महत्वपूर्ण योगदान देत असणारे सर्वसामान्य लोक/समाज, अन् त्यांच्या वाटेला आलंय दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार...
अन् यातून जन्म होतो कुपोषणाचा!

केवळ आणि केवळ पुरेसे व आवश्यक अन्नघटक न मिळाल्याने बालके कुपोषणाने ग्रासले जातात.
गरिबी, अन्नाची कमतरता, माता व बालकांचे आरोग्य व पोषण संदर्भात माहितीची कमतरता आदी मुख्य कारणे कुपोषणास कारणीभूत असतात.

'NFHS-5' सर्वेक्षणानुसार, 57% पेक्षा अधिक महिला (वयोगट 15-49) आणि 67% पेक्षा अधिक मुले (06-59 महिने) अशक्तपणाने (Anemia) ने ग्रासलेले आहेत.
कुपोषणामुळे स्वादुपिंड, यकृत, थायरॉइड, प्रतिकारशक्ती यांवर परिणाम तसेच श्वसनसंस्था यांचे रोग वाढतात.

यावर मात करण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. सरकार 'एकात्मिक बालविकास कार्यक्रम, माध्यान्ह आहार योजना, पोषण अभियान' यांसारखे कार्यक्रम राबवत असते. त्यावर अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली जाते.

'रोजगार हमी योजनेंतर्गत' पालकांना आर्थिक पाठबळ मिळेल. ज्यातून पोषणाच्या गरजा पूर्ण होऊ शकतील.
ह्या योजनांची कार्यतपासणी होणेही तितकेच महत्वाचे!

~ सचिन विलास बोर्डे

2/4

Anemia | Malnutrition | MGNREGA | ICDS

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!