Posts

Showing posts with the label Anemia

9. विकासाच्या वाटेवरील भारत!

काही दिवसांपूर्वी आपण ' बालदिनानिमित्त ' विविध समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव केलायं. खरेतर ते योग्यच... पण भारताच्या विकासाला महत्वपूर्ण योगदान देत असणारे सर्वसामान्य लोक/समाज, अन् त्यांच्या वाटेला आलंय दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार... अन् यातून जन्म होतो कुपोषणाचा ! केवळ आणि केवळ पुरेसे व आवश्यक अन्नघटक न मिळाल्याने बालके कुपोषणाने ग्रासले जातात. गरिबी, अन्नाची कमतरता, माता व बालकांचे आरोग्य व पोषण संदर्भात माहितीची कमतरता आदी मुख्य कारणे कुपोषणास कारणीभूत असतात. ' NFHS-5 ' सर्वेक्षणानुसार, 57% पेक्षा अधिक महिला (वयोगट 15-49) आणि 67% पेक्षा अधिक मुले (06-59 महिने) अशक्तपणाने (Anemia) ने ग्रासलेले आहेत. कुपोषणामुळे स्वादुपिंड, यकृत, थायरॉइड, प्रतिकारशक्ती यांवर परिणाम तसेच श्वसनसंस्था यांचे रोग वाढतात. यावर मात करण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. सरकार ' एकात्मिक बालविकास कार्यक्रम , माध्यान्ह आहार योजना, पोषण अभियान ' यांसारखे कार्यक्रम राबवत असते. त्यावर अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली जाते. ' रोजगार हमी योजनेंतर्गत ' पालकांना आर्थ...