Posts

Showing posts with the label Mahatma Jyotiba Phule

171. विकासाच्या वाटेवरील भारत!

" शिक्षण " हा व्यक्तीच्या, समाजाच्या अन् देशाच्या विकासाला गतिमान करणारा घटक आहे. ' एखादा व्यक्ती, समाज आणि देश जितका शिक्षित, सुशिक्षित असेल तितका तो व्यक्ती, समाज आणि देश गतिशील असतो, प्रगतिशील असतो. ' शिक्षणातून ' चिकित्सा ' जन्मला येते. चिकित्सा ' प्रश्नांना ' जन्म देते. हेच प्रश्न ' मानवी विवेक ' जागृत करतात. अन् हाच मानवी विवेक मानवाला सत्य-असत्य, चांगलं-वाईट, खर-खोट या स्वरूपाचं वर्गीकरण करण्याची ताकद देतो. सत्याचा, चांगल्याचा, खऱ्याचा स्वीकार करून असत्याला, वाईटाला, खोट्याला नाकारलं की शिक्षणाचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येत. आता जरा भारताच्या इतिहासाचा संदर्भ घेऊया. भारताच्या इतिहासात डोकावल्यास शिक्षणावर ' पुरुषी वर्चस्व ' असल्याचं आपल्याला समजत. परिणामी स्त्रीयांना प्रश्न जन्माला घालणाऱ्या चिकित्सक आणि विवेकी शिक्षणापासून वंचित ठेवलं गेल. ' शिक्षणावर मक्तेदारी प्रस्थापित करून सत्ता टिकविली गेली. अन् समाजातल्या शिक्षण नसलेल्यांवर ही सत्ता गाजविली गेली.' याच विषम समाजरचनेची चिकित्सा करून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्...

79. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकताच ' फुल्यांच्या ' जीवन-कार्यावर आधारित " सत्यशोधक " नामक चित्रपट बघितला. पुस्तकातील इतिहास वाचणे अनेकदा डोईजड जाते. हा मानवी गुणधर्मच. मात्र चित्रपटाच्या साहाय्याने हाच इतिहास समजून घेणे सोईचे होते. सत्यशोधक चित्रपट यामुळेच उल्लेखनीय ठरतो. या चित्रपटात फुले दाम्पत्याच्या महत्त्वपूर्ण संघर्षमय, सुधारणात्मक कार्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपट पाहताना जणूकाही आपणही त्या काळात वास्तव्य करतोय, फुले दाम्पत्याला प्रत्यक्षात पाहतोय, असा अनुभव येतो. दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांचे हे कौशल्य देखील उल्लेखनीयच.  स्वतःला 'आधुनिक (Modern)' म्हणवून घेणारे आपण, द्वेष निर्माण करणारे, हिसंक असलेले, अश्लीलता पसरवणाऱ्या चित्रपटांना अधिकचे प्राधान्य देतो. असे चित्रपट देशभर गाजतात. त्यातुलनेत इतिहासावर आधारित, सत्यावर आधारित, वैज्ञानिकतेवर आधारित चित्रपटांना आवश्यक तेवढी प्रसिध्दी मिळताना दिसत नाही. हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. अनेकदा तथ्यावर आधारित चित्रपटांतही मनोरंजनाच्या अथवा इतर हेतूने काही बाबी नव्याने घातल्या जातात किंवा काढून टाकल्या जातात. पर...

76. विकासाच्या वाटेवरील भारत!

" एखाद्या समाजाची अथवा देशाची प्रगती ही तिथल्या महिलांच्या प्रगतीवरून ठरते ," हे वैश्विक सत्य. यामुळेच ' स्त्री-सक्षमीकरणाची ' चर्चा जागतिक पातळीवर केली जाते. इतिहासाची पाने चाळल्यानंतर आपणांस लक्षात येईल की, स्त्री-वर्गाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या हक्काचा वाटा मिळविण्याकरिता अनेकदा संघर्ष करावा लागला. एकोणिसाव्या शतकात ' स्त्रीवादाने ' वैचारिक तत्त्वज्ञान मांडून स्त्रियांच्या हक्कांच्या मागणीला व्यापकता प्रदान केली. भारतातील महिलांना देखील पुरुषांप्रमाणे हक्क-अधिकार असावेत, त्यांनीही शिक्षित व्हावे याकरिता ' सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांनी ' रुढीवादी व्यवस्थेला विरोध करत आधुनिक शैक्षणिक मूल्यांची सुरू केलेली चळवळ देखील अत्यंत महत्वपूर्ण बनली. शेवटी याच ऐतिहासिक जडणघडणींचा प्रभाव ' भारतीय संविधानावर ' पडला. यातून विविध हक्कांच्या व्यापक तरतुदी स्त्रियांसाठी करण्यात आल्या. परिणामी, (पुरुषसत्ताक व्यवस्थेत) महिलांनाही स्वतःच्या विकासाची/प्रगतीची संधी प्राप्त झाली. उपरोक्त सैद्धांतिक विश्लेषणानंतर वा...