48. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताने लोकसंख्येत पहिला क्रमांक मिळविला हे ठाऊकच आहे. जसजशी लोकसंख्या वाढते तशी रोजच्या वापरातील वस्तूंची मागणी वाढते. अन् बहुतांश वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनात विकल्या जातात. प्लास्टिक म्हणजे 20व्या शतकातील अद्भुत शोधच...

मानवी जीवनच प्लास्टिक ने वेढलयं. केसाच्या कंगव्यापासून पायातल्या चपली-बुटा पर्यंत हे प्लास्टिक मानवी जीवनाशी सलंग्नित झालंय.

त्याचा उपभोग घेऊन झाला की ते प्लास्टिक आपण हव्या त्या ठिकाणी मनसोक्तपणे फेकून देतो किंवा जाळून टाकतो. 'पुढे त्याच काय होत असेल बरं?' याची आपल्याला कल्पनाच नसते.

फेकलेल्या प्लॅस्टिकची दाहकता निदर्शनास आणण्यासाठी आजच्या लेखाची जुळवाजुळव करीत आहे. 

प्लास्टिकचे विघटन व्हायला कित्येक वर्ष लागतात. हवेद्वारे, पाण्याद्वारे ते नाले-ओढे-तलाव-नदी-समुद्राला येऊन मिळते. पाण्यात रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्यातील सजीवांना तसेच मानवाला हानी पोहचविते. हीच प्रक्रिया जमिनीत देखील घडते. जमिनीची सुपीकता कमी करण्यात प्लॅस्टिकची मोठी भूमिका असते. प्लास्टिक जाळल्यास 'Carbon Dioxide, Sulfur Dioxide, Carbon Monoxide, Dioxins' अशी कितीतरी रसायने/वायू हवेत मिसळतात. यांच्या नावाप्रमाणेच भयावह आजार मानवाला जडतात. 

उपाययोजना - 
घरगुती पातळीवर कचऱ्याचे सुव्यवस्थापन करा. प्लास्टिकचा वापर कमी करा (Reduce). जमवलेल्या प्लास्टिकचा वापर इतर कारणांसाठी करा (Reuse). पुनर्वापरासाठी प्लास्टिक कचराकुंडीतच टाका (Recycle).

'माझा कचरा माझी जबाबदारी' हे सूत्र अंगीकारणे महत्वाचे ठरते..!

~ सचिन विलास बोर्डे

11/4

Plastic | Pollution | Reduce Reuse Recycle


Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!