Posts

Showing posts with the label Road Accident

87. विकासाच्या वाटेवरील भारत!

पुण्याच्या कल्याणीनगर भागातील " पोर्श अपघात प्रकरणाची " बातमी मनाला सुन्न करणारी होती. विविध वृत्तवाहिन्यांवर, समाज माध्यमांवर या प्रकरणाचे वृत्त प्रसारित केले गेले. 'त्या' आरोपीस अगदी 'बालिश शिक्षा' सुनावल्याने या प्रसारास वेग मिळाला. अपघातानंतर त्याने 300 शब्दाचा निबंध लिहावा. त्याने 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसह वाहतूक पोलिसांना मदत करावी. मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेऊन त्यासंदर्भातील अहवाल न्यायालयास सादर करावा. या अटी-शर्तींवर आरोपीस ' बाल न्याय मंडळाने ' जामीन मंजूर केली होती. यामुळेच नागरिकांनी विविध माध्यमातून संताप व्यक्त केला. कुठल्याही गुन्हेगारांस ' शिक्षा देण्यामागे प्रामुख्याने दोन हेतू ' असतात. पहिला हेतू म्हणजे दिलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांच्या आचरणात बदल व्हावा. अन् दुसरा हेतू म्हणजेच सतत त्याच-त्याच गुन्ह्यांची पुनरावृत्ती थांबविणे. पोर्श प्रकरणात पहिल्या हेतुवरच अधिकचा भर दिला. दुसरा हेतू दुर्लक्षित झाल्याने त्याचे पडसाद नागरिकांच्या संतापातून व्यक्त झाले. 'पैसे दिल्यावर गुन्ह्यातून सुटका लवकर होते, आमच्याकडुन अपघात झ...