17. विकासाच्या वाटेवरील भारत!
गेल्या लेखामध्ये (4/3) आपण संपत्तीचे विषम वितरण स्पष्ट करण्याकरिता विश्लेषकांची मते मांडली होती. तद्वतच 'ऑक्सफॅम ( Oxfam )' चा अहवाल प्रकाशित झाला. भारतातील 1 टक्के लोकांकडे सुमारे 40.5 टक्के इतकी संपत्ती एकवटलेली आहे. तथापि 50 टक्के (700 दशलक्ष) जनतेच्या वाटेला 3 टक्के संपत्ती आल्याचे हा अहवाल दर्शवितो. अशा विषम वितरणाचे फलित काय असू शकेल, याची चाचपणी आपण अगोदर केलेली आहे. 'गरिबी आमच्याच वाट्याला का?' असा प्रश्न सर्वांचाच मात्र त्याची उत्तरे शोधण्याची धडपड आपण करीत नाही. हेच मोठे दुर्दैव. किंबहुना आपण वाट्याला आलेली ती लाचारी स्वीकारत जगत असतो. 'ऐतिहासिक पार्श्वभूमी' - मानवी उत्क्रांतीपासून मानवाचा आणि संसाधनांचा संबंध पहावयास मिळतो. मानवी विवेक विकसित होत गेला अन् मानवाने स्वार्थी वृत्ती धारण करण्यास सुरुवात केली. त्या स्वार्थावर आळा बसावा आणि संसाधनांचे समान वितरण व्हावे यासाठी राज्यसंस्थेचे निर्माण करण्यात आले. खरेतर शासनाची आजही हीच भूमिका असावी. असे अपेक्षित. या अहवालामध्ये सविस्तर विश्लेषण नमूद केले आहे. त्याचा आढावा घेत जनतेने आणि शासनाने योग्य भूमिक...