Posts

Showing posts with the label Vasudhaiv Kutumbakam

7. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारत येणाऱ्या डिसेंबरमध्ये ' जी-20 ' अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार. विकसनशील देशांच्या समस्या मांडण्याचे व्यासपीठ भारताला मिळणार आहे. जी-20 बद्दल थोडक्यात - जी-20 देशांमध्ये अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय समुदाय, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे. जी-20 देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे 80 टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा 75 टक्के भाग या देशात आहे. जगाची 60 टक्के लोकसंख्या या देशात राहते व जगातील निम्मा भूभाग या देशात आहे. एकंदरीतच ह्या आकडेवारीचे यजमानपद भारत भूषविणार... अर्थव्यवस्थेतील जागतिक अडथळे, मुक्त व्यापार, सदस्य देशांमध्ये आर्थिक समन्वय आणि स्थिरता, रोजगार, अन्न सुरक्षा, पर्यावरण, सार्वजनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, विज्ञान- तंत्रज्ञान, दहशतवादाची समस्या, आरोग्य असे समकालीन कळीचे मुद्दे भारताच्या जी-20 चर्चेची रूपरेखा असू शकेल. अर्थातच भारत स्वतःचा विकास साधत असतांना इतरांचाही विचार व्हावा यासाठी ...