51. विकासाच्या वाटेवरील भारत!
' आम्ही भारताचे लोक ' या वाक्याने घटनेच्या प्रस्तावनेची सुरुवात होते. मग प्रश्न पडतो, लोकांच्या या गटात केवळ स्त्री आणि पुरुषच येतात का, अन् ज्यांना आपण 'तृतीयपंथी/हिजरा/किन्नर' या नावाने ओळखतो त्यांना या गटात स्थान आहे काय? या प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलयं. न्यायालयाने 2014 साली एका याचिकेची सुनावणी करत तृतीयपंथीयांना तिसऱ्या लिंगाचा (Third Gender) दर्जा दिला. तसेच कलम 14 आणि 21 ची कक्षा रुंदावत त्यांनादेखील अधिकार मिळवून दिले. सामाजिक स्थितीबाबत - एखाद बाळ जन्माला येतं. जन्मावेळी ते बाळ स्त्री अथवा पुरुष असतं. कालांतराने त्याच्या लैंगिक अभिमुखतेत (Sexual Orientation) बदल होतात. तृतीयपंथीयांच्या या वेगळेपणाचे पहिले विरोधक आई-वडील असतात. परिणामी त्यांना कुटुंबापासून, घरापासून दूर करण्यात येते. ' वसुधैव कुटुंबकम जाणणारा आपला समाज तृतीयपंथीयांचा तिटकारा करतो.' त्यांना अनेक राजकीय-आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक अडचणींना सामोरे जावे लागते. तृतीयपंथीयांच्या व्यथेची सत्यकथा दर्शविणारा ' ताली (Taali) ' नामक चित्रपट आपण नक्कीच बघावा. तृती...