Posts

Showing posts with the label Terrorism

137. विकासाच्या वाटेवरील भारत!

22 एप्रिलला काश्मीरातील पहेलगाम येथे दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादाला प्रत्युत्तर देणे भारतासाठी आवश्यकच होते. परिणामी दहशतवाद्यांना अद्दल घडविण्याकरिता भारताने 07 मे ला " Operation Sindoor " च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केले. हीच बाब तीन मुद्द्यांच्या साह्याने समजून घेऊया... पहिला मुद्दा, भारताच्या दहशतवादावरील या हल्ल्याचा अर्थ पाकिस्तानने स्वतःवरील हल्ला असा घेतला. अन् भारतावर प्रतिहल्ला करून युद्धास सुरुवात केली. दहशतवादाच्या प्रश्नावर भारत अन् पाकिस्तानने मिळून उत्तरे शोधणे अपेक्षित होते. मात्र दहशतवाद्यांना छातीशी कवटाळणाऱ्या पाकिस्तानकडून ही अपेक्षा ठेवणं अपेक्षाभंगच ठरला. दुसरा मुद्दा, ज्या उद्देशाने या लष्करी कारवायांची सुरुवात झाली होती तो उद्देश बाजूला होतोय. या युद्धात आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शिरकाव झालेला दिसतोय. दोन्ही देशांना इतर देशांचा छुपा पाठिंबा असल्यास अन् बदल्याच्या भावनेच्या चक्रात हे युद्ध अडकल्यास या युद्धाला पूर्णविराम नसेल. जो देश दीर्घकाळ युद्धात गुंतलेला असतो त्या देशाच्या विकासात अडथळे निर्...

135. विकासाच्या वाटेवरील भारत!

लेख क्र. 30/4 मध्ये ' धर्मावर धर्म घासल्याने ' निर्माण होणाऱ्या आगीचे विश्लेषण आपण बघितले होते. दोन गटांत फूट पडल्याने तिसऱ्या गटाला वर्चस्व मिळवणे सुलभ होते हेही आपण बघितले. नुकत्याच घडलेल्या " पहेलगाम " मधील घटनेनंतर या तिसऱ्या गटात " दहशतवादाचाही " समावेश करावा लागेल. देशांतर्गत असलेल्या धार्मिक फाटा-फुटींचा, जातीय समीकरणांचा आजवर राजकीय पार्ट्यांना अन् राजकारण्यांना सत्ता टिकविण्याकरिता फायदा होत आला. मात्र याच धार्मिक फाटा-फुटींचा फायदा दहशतवादी संघटनाही घेऊ शकतात हे काश्मीरातील पहेलगाम घटनेने सिद्ध केलयं. देशातील सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी आपल्या सोयीनुसार जातीय समीकरणांचा उपयोग करून घेतला. परिणामी दोन धर्मांतील नागरिकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. दोन्ही धर्मांतील नागरिक एकमेकांपासून दुरावत गेले. आता हा दुरावा अत्यंत टोकाला पोचलेला दिसतोय. ' हिंदू विरुद्ध मुस्लिम ' हेच समीकरण अनेकांच्या डोक्यात फिट झालंय. याच समीकरणाचा फायदा घेत पहेलगाम घटनेने या दुराव्यात भर घातलीय, देशात पुन्हा अशांतता निर्माण केलीय. पहेलगाम घट...

54. विकासाच्या वाटेवरील भारत!

आंतरराष्ट्रीय पातळीवर "दहशतवाद (Terrorism)" ही अत्यंत ज्वलंत समस्या ठरतेय. एखादा देश किंवा गट राजकीय, धार्मिक वा तत्सम हेतू साध्य करण्याकरिता दहशतवादाचा मार्ग अवलंबतो. परिणामी दुसरा देश प्रतिहल्ल्याने उत्तर देतो. या घडामोडीत शेकडो निर्दोष लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. मानवी हक्क पायदळी तुडवल्या जातात, व्यापार, अर्थव्यवस्था विस्कळीत होते. दहशतवादाला राजकीय, तात्विक, विचारप्रणालीत्मक, वांशिक किंवा धार्मिक आधार जरी पुरविण्यात आला तरी दहशतवाद समर्थनीय ठरू शकत नाही. गरिबी, बेरोजगारी, शैक्षणिक मागासलेपण, धार्मिक मूलतत्त्ववादाचा प्रभाव ई. कारणे दहशतवादी निर्माण होण्यास पाठबळ पुरवितात. दहशतवादाला आळा घालण्याकरिता विविध आंतरराष्ट्रीय करार तथा संस्था कार्यरत असल्या तरी समस्येचे मूळ शोधून त्यावर घाव घालणे गरजेचे ठरते. दहशतवाद्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, धार्मिक पाठबळ, मनोबल प्रदान करणाऱ्या मानवताविरोधी घटकांचा शोध घेणेही अतिमहत्वाचे. भारताने दहशतवादाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. 'इस्राईल-पॅलेस्टाईन' च्या चालू झालेल्या युद्धमय घडामोडीत भारताने मानवतेला प्राथ...