Posts

Showing posts with the label Palestine

54. विकासाच्या वाटेवरील भारत!

आंतरराष्ट्रीय पातळीवर "दहशतवाद (Terrorism)" ही अत्यंत ज्वलंत समस्या ठरतेय. एखादा देश किंवा गट राजकीय, धार्मिक वा तत्सम हेतू साध्य करण्याकरिता दहशतवादाचा मार्ग अवलंबतो. परिणामी दुसरा देश प्रतिहल्ल्याने उत्तर देतो. या घडामोडीत शेकडो निर्दोष लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. मानवी हक्क पायदळी तुडवल्या जातात, व्यापार, अर्थव्यवस्था विस्कळीत होते. दहशतवादाला राजकीय, तात्विक, विचारप्रणालीत्मक, वांशिक किंवा धार्मिक आधार जरी पुरविण्यात आला तरी दहशतवाद समर्थनीय ठरू शकत नाही. गरिबी, बेरोजगारी, शैक्षणिक मागासलेपण, धार्मिक मूलतत्त्ववादाचा प्रभाव ई. कारणे दहशतवादी निर्माण होण्यास पाठबळ पुरवितात. दहशतवादाला आळा घालण्याकरिता विविध आंतरराष्ट्रीय करार तथा संस्था कार्यरत असल्या तरी समस्येचे मूळ शोधून त्यावर घाव घालणे गरजेचे ठरते. दहशतवाद्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, धार्मिक पाठबळ, मनोबल प्रदान करणाऱ्या मानवताविरोधी घटकांचा शोध घेणेही अतिमहत्वाचे. भारताने दहशतवादाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. 'इस्राईल-पॅलेस्टाईन' च्या चालू झालेल्या युद्धमय घडामोडीत भारताने मानवतेला प्राथ...