Posts

Showing posts with the label NEET

89. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागच्या लेखात आपण दहावी-बारावी नंतर कुठले शिक्षण क्षेत्र निवडावे यासंदर्भात चर्चा केली होती. अनेक विद्यार्थ्यांना " वैद्यकीय अभ्यासक्रमाची " आवड असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी National Eligibility cum Entrance Test (NEET) ही कठीण मानली जाणारी परीक्षा द्यावी लागते. National Testing Agency (NTA) द्वारे ही परीक्षा घेतली जाते. थोडक्यात, चांगले कॉलेज मिळण्याकरिता चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर असतो. यंदाच्या या नीट परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते.  नियोजित वेळेआधीच लागलेल्या या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले. यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पेपर फुटल्याचा आरोप देखील केला जातोय.  या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अन् शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थाच ' अपारदर्शक आणि दोषयुक्त ' असतील तर या लाखो विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा मोठा प्रश्न. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षांत विद्यार्थी मोठी ' बौद्धिक मेहनत ' घ...