Posts

Showing posts with the label Manipur

43. विकासाच्या वाटेवरील भारत!

मणिपूरमध्ये घडलेल्या अमानवीय कृत्याबद्दल या लेखाच्या माध्यमातून 'प्रतिसाद आणि प्रतिक्रिया' नोंदवत आहे. ही संपूर्ण घडामोड आपणांस चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. काही पुरुषांच्या गटाने दोन स्त्रियांना नग्न अवस्थेत रस्त्यावरून फिरवले, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यांची घरे जाळण्यात आली. '4 मे' च्या व्हिडिओने '19 जुलै' ला अख्या भारताची झोप उडवली. अनेकांनी Tweets केलेत, विविध आश्वासने दिलीत. केवळ भाषणबाजी करून काहीही हाती लागणे नाही. गरज आहे ती ' कृतीशील प्रतिसादाची '... गुन्हा घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात पण असे 'गुन्हे घडूच नये अथवा अशा गुन्ह्यांना पाठबळ मिळूच नये. अशी शासन-प्रशासनाची भूमिका असावी.' अन् त्या शासनावर, त्या प्रशासनावर शोधकबुद्धी, सुधारकवृत्ती असलेल्या समाजाचे वर्चस्व असावे.  ज्या भारताला तुम्ही मातेचा दर्जा देताय त्या देशात स्त्रियांना नग्न अवस्थेत भर रस्त्यावर छळल्या जातयं. काही प्रकरणे उघडकीस येतात तर काही प्रकरणांची मुस्कटदाबी केल्या जाते. गुन्हेगारीला पाठबळ देऊन आपण प्रशासनाला नागड करतोय हे लक्षात घ्यायला हवं.  टोकाची प्र...