Posts

Showing posts with the label Kerala

3. विकासाच्या वाटेवरील भारत!

"शंका उपस्थित न करता चमत्काराला सत्य मानून शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते" एकविसाव्या शतकात इतिहासजमा होत असलेली नरबळीची प्रकरणे पुन्हा नव्याने वर डोके करू पाहतायं..! नुकतेच केरळमधील थिरुवल्लाजवळील कोंझेचेरी तालुक्यातील एलंथूर खेड्यात घडलेले विधिवत हत्येचे हे प्रकरण मागासतेचे प्रतिनिधित्व करते. आधुनिकतेकडे वाटचाल करीत असलेल्या समाजातील काही घटकांद्वरे केवळ आत्मकेंद्री स्वार्थासाठी नरबळीचा मार्ग अवलंबिने कितपत योग्य ठरते, हे आपणच समाज घटक म्हणून विचार करणे महत्वाचे ठरेल. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 'जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत' अटक केली असली तरी समाजात बुध्दीसापेक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची नितांत गरज यावरून भासत आहे... येणाऱ्या पिढीने असल्या मानसिक गुलामगिरीला बळी न पडता तर्कशुद्ध विचार करण्यावर भर द्यावा कारण तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे पहिले लक्षण होय ..! ~ सचिन विलास बोर्डे 1/3 Human Sacrifice | Kerala | Superstition NEXT 🔹 PREVIOUS