Posts

Showing posts with the label ISRO

42. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या दोन दिवसांपूर्वी ' चंद्रयान-3 ' चा जयघोष तुम्ही-आम्ही बघितला. खरेतर प्रत्येक नागरिकासाठी ही गर्वाची बाब आहे. या प्रत्येक नागरिकाने निदान चंद्रयान-3 काय?, भारतासाठी ते महत्वाचं कसं? अशी चिकित्सक प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्वाचे ठरते. या मोहिमेचं महत्व थोडक्यात पटवून देण्यासाठी सदर लेख सादर करीत आहे. ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरते. अंतराळात विविध शोध-मोहिमा राबवणारे प्रगत देश जसे रशिया, जपान, चीन, अमेरिका यांच्या यादीत भारताला स्थान मिळतंय. अगदी कमी खर्चात या मोहिमांचे आयोजन करण्यासाठी 'इस्रोला' ओळखण्यात येत आहे. चंद्रावर विविध वैज्ञानिक प्रयोग या मोहिमेतून शक्य होणार आहे. भारतीय वैज्ञानिकांची उत्कटता, अचूकता यातून दिसते. भारताच्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांकडे जगदेखील लक्ष ठेऊन आहे.  चंद्रावर जाण्याचा हा तिसरा प्रयत्न. याअगोदर आलेल्या अपयशातून इस्रोचे/वैज्ञानिकांचे सातत्य डगमगले नाही. 'प्रयत्नातील सातत्यच यशाचा मार्ग निश्चित करीत असते.' हे आपणदेखील शिकायला हवे. प्रगत राष्ट्रांनी सुरू केलेल्या या अंतराळातील स्पर्धेत भारताचा यशस्वी सहभाग...