40. विकासाच्या वाटेवरील भारत!
बऱ्याचदा मला 'जगावं कसं' हा प्रश्न पडतो... सगळ्याच विवेकी मनुष्यप्राण्याला हा प्रश्न पडतोच... याच प्रश्नाच्या उत्तराचा व्यक्ती शोध घेत असते. अन् यातील सर्वमान्य शोध म्हणजेच 'जगावं असं की ज्या समाजात आपण वावरत आहोत, त्या समाजाला अनुरूप आपले आचार-विचार, राहणीमान असावं.' याला एक पुस्तकी सिद्धांत म्हणता येईल, मात्र प्रत्यक्षात यात दुविधा निर्माण होताना दिसते. ज्यावेळी आपण एखाद्या समाजाची चिकित्सा करतो त्यावेळी त्यातील सगळ्याच योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. पण भारतात चिकित्सा करणाऱ्यांची संख्या जरा कमीच... अन् डोळेझाकपणे अयोग्य बाबी स्वीकार करणारे जरा जास्तच... याच तफावतीमुळे अनेक अनिष्ट रूढी-परंपरा समाजात रुतून बसलेल्या दिसतात. मग पुन्हा प्रश्न पडतो, जगावं कोणत्या समाजासाठी? याच अगदी सोप उत्तर म्हणजे ' जगावं त्या समाजासाठी जो समाज न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रदान करतोय.' कुठलाच समाज परिपूर्ण नसतो. समजाचा विकास व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, नैतिक विकासवरून ठरतो. राज्यघटनेतील 'कलम 51A' जगावं कसं ...