14. विकासाच्या वाटेवरील भारत!
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची पहाट आपण गाठलीय. गतवर्षात आपण अनेक सुख-दुःखाला सामोरे गेलो आहोत. वैयक्तिक पातळीवर विचार करता अनेकांनी यश-अपयश गाठले, अनेकांसाठी आनंदाचे वर्ष होते तर अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, तथा अनेक समस्यांना सामोरे गेले. देश पातळीचा विचार करता, भारताने अनेक यशाच्या शिखरावर आपले अस्तित्व रोवले. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. देशांतर्गत सुध्दा भारताने विविध जनहिताच्या योजना/धोरणे/निर्णय या माध्यमातून यश संपादन केले. तथापि भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भुकेचा प्रश्न, कुपोषण, गरिबी, आरोग्य, गुन्हेगारी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, आत्महत्येचा प्रश्न, लोकसंख्येचा प्रश्न ह्या पारंपारिक समस्या आजही पहावयास मिळतात. ह्या समस्येचं निराकरण व्हावं, तरुणांने शिक्षणाकडे वळावे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, महिला सक्षमीकरण व्हावे, गुन्हेगारीला आळा बसावा, भारताचा विकास अजून गतिशिल व्हावा या इच्छा मनाशी बाळगत आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा अर्पण करीत आहे..! ~ सचिन विलास बोर्डे 4/1 2023 | Happy New Year | Good Wis...