Posts

Showing posts with the label Exchange Thoughts

11. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्लीचा समाज गुंतलाय सण-समारंभ-जयंत्या पार पाडण्यात. यात काही वावगे नाही. पण हे कितपत योग्य याची चाचपणी होणेही महत्त्वाचे..! दुसऱ्या बाजूला विविध पदे तथा उच्चपदे भूषविणारे विचारशील प्राणी. त्यांना खरेच विचारशील म्हणावे का हा मोठा प्रश्न. ते केवळ आपल्या हितासाठी 'थोर व्यक्तिमत्त्वांची, संताची, महापुरुषांची' हवी तशीच मांडणी करतात. व्यापक विचार असलेल्या महापुरुषांना संकुचित चौकटीत जखडून ठेवतात. "महापुरुषांचा पराभव त्यांच्या विरोधकांकडून अथवा शत्रूच्या हातून नव्हे, तर अंधानुकरण करणाऱ्या त्यांच्याच अनुयायांकडून होतो" याचाच पुरेपूर फायदा उचलण्याचे काम राजकारणी तथा इतर समाजघटक करतात. कुठलातरी नेता कुठल्यातरी थोर व्यक्तिमत्वाबद्दल संकुचित वक्तव्य करतो. आणि आपणही डोळेझाकपणे त्याला समंती देतो, ही मानसिक मागासतेची लक्षणेच म्हणावी लागतील..! भारतीय समाजानेही ह्या महापुरुषांची वाटणी करून घेतलीय. 'हे आमचे ते तुमचे' माझा तरुणांना आणि एकंदरीत भारतीय समाजाला प्रश्न असेल, आपण महापुरुषांना जयंती, सण-समारंभ, पुण्यतिथी, स्मारके येवढ्या पुरतेच मर्यादित का ठेवतोय? होऊ द्या विचारा...