Posts

Showing posts with the label Digital Scams

110. विकासाच्या वाटेवरील भारत!

एकीकडे मानवाने मानवी विवेक विकसित करून तंत्रज्ञानाच्या विकासाला गतिमान केले. सोबतच या 'डिजिटल युगातील डिजिटल मानवाने' तंत्रज्ञानाच्या विकासातून मानवी विकास साध्य करण्याकरिता नवनवीन कल्पनांचा आविष्कार केला. दुसरीकडे काहींनी या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची अन् गुन्हेगारीची सांगड घालून " सायबर गुन्हेगारी " या संकल्पनेचा आविष्कार केला. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्हेगारीही विकसित होत गेली. याच सायबर गुन्हेगारीचं विकसित झालेलं अलीकडील रूप म्हणजे " डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) ." डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? - या ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या प्रकारात गुन्हेगार साधा किंवा व्हिडिओ कॉल करतात. हे गुन्हेगार खोटी कागदपत्रे दाखवून पोलिस, सीबीआय, ईडी या विभागातील अधिकारी असल्याचे सांगतात. विविध आरोप करून अटक करण्याची भीती दाखवतात. अटकेतून सुटण्याकरिता ठराविक रक्कम जमा करण्याची मागणी केली जाते. ज्यांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसते ते अशा बनावट प्रकरणांना बळी पडतात. खबरदारी कशी घ्याल? - कुठल्याच गुन्ह्याकरिता डिजिटल अरेस्ट ची तरतूद केलेली नाही. ही बाब लक्षात घ्या...