81. विकासाच्या वाटेवरील भारत!
आज आंबेडकरांची जयंती. आंबेडकरांच्या कुठल्या कार्यावर हा लेख सादर करावा, याविषयी गेल्या तासाभरापासून डोक्यात विविध विचार आलेत. अन् अचानक प्रश्न पडला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर..?" या प्रश्नाच्या आधारेच आजचा लेख प्रकाशित करीत आहे. आज आंबेडकर असते तर, त्यांचा पहिला विरोध इथल्या जाती-धर्मांवर आधारलेल्या आणि फाटा-फुटीच्या राजकारणाला तसेच धर्मनिरपेक्षतेचे तत्व, संवैधानिक निती-मूल्ये धुळीस मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांना असता. दुसरा विरोध सामाजिक आणि आर्थिक विषमतेला असता. आजही देशात विविध आधारावर असमानतेची/भेदभावाची अनेक उदाहरणे समोर येतात. आर्थिक विषमतेने कमालीची उंची गाठलेली दिसते. आंबेडकरांनी याचे चिकित्सक विश्लेषण करून यावरील सखोल उपाय-योजना नमूद केल्या असत्या. तिसरा विरोध त्यांचीच जयंती साजरी करणाऱ्यांना असता. आंबेडकर म्हणाले असते, बहुजनांनो, तरुणांनो! जेवढी ऊर्जा तुम्ही महापुरुषांच्या जयंतीमध्ये नाचण्यासाठी खर्च करीत आहात, तीच ऊर्जा तुम्ही वाचण्यासाठी उपयोगात आणायला हवी. सण-समारंभात, जयंत्यात लाखो रुपयांची उधळण केल्यापेक्षा ग्रंथालये उघडुन त्यात लाखो रुपयांची पुस्तके घाल...