19. विकासाच्या वाटेवरील भारत!
काही दिवसांपूर्वी 'केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण' ( AISHE ) ने 2020-21 चा अहवाल प्रकाशित केला आहे. "अहवालानुसार" - 2019-20 ची तुलना करता 2020-21 मध्ये देशभरातील विद्यार्थी नोंदणीत 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंडरग्रेजुएट स्तरावर सर्वाधिक नावनोंदणी आढळून आलेली दिसते. उच्च शिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांची नोंदणी, 2019-20 मध्ये 45% होती, ती 2020-21 मध्ये एकूण नोंदणीच्या 49% पर्यंत वाढली आहे. हे उल्लेखनीय. तथापि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या शाखेत स्त्रियांची नावनोंदणी पुरुषांपेक्षा मागे असलेली आढळते. तसेच इतर काही विवेचन या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचा आपण आढावा घेणे गरजेचे. नावनोंदणीची आकडेवारी वाढली म्हणजे तरूणांमध्ये शिक्षणाचे/साक्षरतेचे प्रमाण वाढले या निष्कर्षाला जाणे चुकीचे ठरेल. 'नोकरीसाठी शिक्षण' ही भूमिका असलेल्या तरुणाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यालये/महाविद्यालयांची गुणवत्ता, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, अपुऱ्या पायाभूत सुविधा, खाजगी क्षेत्रातील शिक्षणामध्ये भ्रष्टाच...