Posts

Showing posts with the label AI

59. विकासाच्या वाटेवरील भारत!

शाळेत शिकलेला 'अश्मयुगीन मानव' आपणास आठवत असेल. जो कंद-मुळे खायचा, दगडाची हत्यारे/साधने वापरायचा. अगदी साधे जीवन जगायचा. हळूहळू त्याच्या बुद्धीत विचारांनी जन्म घेतला. मानवी विवेकाच्या कक्षा रुंदावल्या अन् तंत्रज्ञानाच्या विकासाने गती पकडली. आज या मानवाचे स्वरूप बदललेय. 'हा डिजिटल मानव डिजिटल युगात जगायला लागला.' ऑक्सिजन इतकं महत्व इंटरनेटला मिळालं. काळानुरूप हे तंत्रज्ञान (Technology) अधिकच विकसित होत आहे. यातीलच एक विकसनशील प्रकार म्हणजेच " Artificial Intelligence (AI) ." थोडक्यात मानवाने निर्माण केलेला हा 'यांत्रिक मेंदूच'..! Robotics, Marketing, Gaming, Education, Health Care, National Security, Cyber Security ई. क्षेत्रात AI ने अनेक उल्लेखनीय कामे पार पाडली आहेत. नैतिकतेचा अभाव, बेरोजगारीत वाढ, पक्षपात (Bias) या AI तील त्रुटीही तितक्याच खऱ्या. AI चा तथा Deepfake चा उपयोग करून फोटो किंवा व्हिडिओ चे Morphing अथवा Editing केल्या जाते. थोडक्यात, महिलांच्या फोटो तथा व्हिडिओला या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हर्च्युअली विवस्त्र केल्या जातं. प्रसिद्ध...