Posts

Showing posts with the label 2025

170. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..! वर्षाची सुरुवात आपण अनेक ध्येय-धोरणे समोर ठेऊन करीत असतो. वर्षभरात आपल्याला ती गाठायची असतात. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आपण वर्षभरात पार पाडलेल्या कार्यांची पडताळणी करतो. याच अनुषंगाने आपण या वर्षात सादर केलेल्या विविध विषयांच्या लेखासंदर्भातील वर्षभराचा आढावा घेऊया... शिक्षण क्षेत्रातील गुण-दोष, विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षांतील गैरप्रकार, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, निवडणुकांविषयक गैरप्रकार, दहशतवाद, नक्षलवाद, पर्यावरणीय समस्या, आरोग्य विषयक समस्या, शेतकरी-कामगारांच्या समस्या, महिलांवरील अन्याय-अत्याचार, घरगुती हिंसाचार, गुन्हेगारी, आत्महत्या अशा अनेक समस्यांचे आकलन तसेच यावरील उपाय-योजनांची चर्चा आपण केली. सोशल मीडियाचे गुण-दोष, शेतीव्यवस्थेचे विश्लेषण, वनांचे महत्व, भारतीय राज्यघटनेचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य प्रवास इत्यादी बाबी अगदी सोप्या भाषेत वाचकांसमोर मी प्रस्तुत केल्या. गाडगे बाबा, तुकोबा, नामदेव यांसारख्या संतांच्या शिकवणीही आपण थोडक्यात समजून घेतल्या. अमेरिका, पाकिस्तान इत्यादी देशांच्या राजकारणाचा भारतावर पडणारा प्रभाव देखील आपण जाणून घेतला. आ...