Posts

Showing posts with the label World Ozone Day

156. विकासाच्या वाटेवरील भारत!

16 सप्टेंबर हा दिवस ' जागतिक ओझोन दिन (World Ozone Day) ' या अर्थाने लक्षात ठेवला जातो. यानुषंगाने पृथ्वीच्या अस्तित्वासाठी " ओझोनचं महत्व " आजच्या लेखातून समजून घेऊया. ओझोनचा अर्थ अन् महत्व - ऑक्सिजनचे तीन अणू मिळून ओझोनचा एक रेणू तयार करतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 50 किलोमीटर वर आढळणाऱ्या स्थितांबर (Stratosphere) या थरात पृथ्वीच्या अवतीभोवती ओझोनचे आवरण आढळते. त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, अंधत्व तसेच पिकांना आणि सागरी जीवसृष्टीला नुकसानकारक असणारे ' Ultraviolet (UV), UV-B ' ही किरणे ओझोनोमुळे शोषली जातात. थोडक्यात, हानिकारक अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण ओझोनच्या थरामुळे शक्य होते. ओझोनचा ऱ्हास - मानवी प्रगतीसाठी पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मनसोक्त शोषण करण्याचा गुणधर्म मानवाने आजपर्यंत जपलेला आहे. याच गुणधर्मातून Chlorofluorocarbons (CFCs), Halons, Carbon Tetrachloride, Methyl Chloroform, Methyl Bromide, Hydrobromofluorocarbons (HBFCs) इत्यादी मानवनिर्मित रसायनांच्या साह्याने मानवाने यंत्रे-तंत्रे अन् विविध वस्तू बनविल्या. आता हीच ...