Posts

Showing posts with the label Saint

129. विकासाच्या वाटेवरील भारत!

सोळाव्या शतकात पुण्याजवळील देहू येथे ' तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) ' यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " तुका, तुकोबा, तुकोबाराया " म्हणून ओळख मिळाली. सोळाव्या शतकातील समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. समाजातील समाज-जीवन, चाली-रीती, रूढी-परंपरा यावर आपले विचार अभिव्यक्त करण्याकरिता तसेच समाजसुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता अन् समाजाला योग्य दिशा देण्याकरिता त्यांनी हजारो " अभंगांची " रचना केली. संत तुकारामांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्याकाळी 'नवस केल्याने लेकरं होतात' असा गैरसमज रुजला होता अन् रुजवला गेला होता. यावर तुकोबांनी आपले मत मांडले. ते म्हणतात, " नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।। " अर्थात नवस केल्याने लेकरं झाली असती तर नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्न तुकोबांनी उपस्थित केला. यातून त्यांची तार्किक बुद्धी अन् वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित होतो. समाजातील सर्वांनाच समान हक्क-अधिकार असावते या दृष्टिकोनातून ते लिहितात, " ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार। बाळें नारीन...

126. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 फेब्रुवारी 1873 रोजी अमरावती जिल्ह्यात डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " गाडगे बाबा " म्हणून ओळख मिळाली. घरा-दाराचा, बायको-लेकरांचा त्याग करून कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट रूढी परंपरांचे उच्चाटन अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन केले. गाडगे बाबा दिवसभर गावाची सफाई करायचे अन् रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या डोक्यातल्या वाईट विचारांची सफाई करायचे. ' लोकांनी आपल्या परिसराच्या स्वच्छतेसोबतच विचारांच्या स्वच्छतेलाही पुरेसे महत्व द्यावे ' ही गाडगे बाबांच्या समाजकार्यामागील प्रेरणा होती. साध्या-सोप्या भाषेत कीर्तन करून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेले दिसते. त्यांच्या कीर्तनातील छोटासा मजकूर याठिकाणी नमूद करतो... ते सांगतात, " बापहो, आता तरी सुधरा, आता तरी मुलाले शिक्षण द्या, पैसे नसतील तर जेवणाचं ताट मोडा... हातावर भाकरी खा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या पण मुलाले शिक्षण दिल्याशिवाय सोडू न...